Saturday, 5 January 2019

जिल्ह्यात आजपासून मनाई आदेश लागू


जळगाव, दि. 5:- शासनाने नुकतेच मराठा समाजाला आरक्षण दिलेले असुन धनगर समाज व मुस्लीम, वडर यांचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. या समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी  शासनाविरुध्द आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच तिहेरी तलाक याबाबत विधेयक राज्यसभेत अडलेले आहे. या विधेयकामुळे  मुस्लीम समाजामध्ये वादंग सुरु आहे. यांचे पडसाद प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी राहुल मुंडके यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व  (3) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन जिल्ह्यात दिनांक 5 जानेवारी  पासून ते दिनांक 19 जानेवारी  2019 पावेतो मनाई आदेश लागू केले आहेत.
०००००

No comments:

Post a Comment