जळगाव, 23 - राज्यात जलशिवार अभियान/जल व मृदसंधारणाची कामे
करण्यासाठी "जलसमृध्दी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामृग्री व्याज अर्थसहाय्य योजना
" मृद संधारण विभागामार्फत सुरु करण्यात आली आहे.
या योजनेतंर्गत यापुर्वी मंजुरी
दिलेल्या ११ अर्जदारांना कर्जवाटप प्रकरणातील प्रक्रिया पुर्ण करणेसाठी व मशीन
खरेदी करणेसाठी १५ जानेवारी, २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यांत आली होती. त्यापैकी एका
अर्जदारानेच मशीन खरेदी केली असुन उर्वरीत १० अर्जदार योजनेतुन रद्दबातल
ठरविण्यांत आले आहेत. त्यानंतर पुन्हा सोडत काढून एकुण २४ अर्जदारांपैकी ५
अर्जदारांची निवड करण्यांत आली होती. व त्यांना १९ जानेवारी, २०१९ पर्यंत कर्जवाटप
प्रकरणातील प्रक्रिया पुर्ण करणेसाठी व मशीन खरेदी करणेसाठी मुदतवाढ देण्यात आली
होती. तर उर्वरीत १९ अर्जदारांची प्रतिक्षाधीन यादी नोटीस बोर्डवर प्रसिध्द
करण्यांत आली होती.
निवड करण्यांत आलेल्या ५ अर्जदारांनी
मुदतीत कर्जवाटप प्रकरणातील प्रकीयापुर्ण केली नसुन मशीनही खरेदी केली नाही.
त्यामुळे हे ५ सुशिक्षित बेरोजगार अर्जदार योजनेतुन रद्दबातल ठरविण्यात आले आहे. व
प्रतिक्षाधीन असलेल्या एकुण १९ सुशिक्षित बेरोजगार अर्जदारांपैकी क्रमनिहाय १५
प्रतिक्षाधीन सुशिक्षित बेरोजगार अर्जदारांना १५ फेब्रुवारी, २०१९ पर्यंत कर्जवाटप
प्रकरणातील प्रकीया पुर्ण करणेसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ प्रतिक्षाधीन यादीतील
क्रमनिहाय येणाऱ्या १५ सुशिक्षित बेरोजगार अर्जदारांनी घ्यावा. प्रतिक्षाधीन
असलेल्या १५ सुशिक्षित बेरोजगार अर्जदारांना जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,
जळगांव यांचे कार्यालयामार्फत आवाहन करणेत येते की, त्यांनी मुदतीत कर्जवाटप
प्रकरणातील प्रक्रीया पुर्ण करून जे.सी.बी.मशीन खरेदी करावी. मुदतीत मशीन खरेदी न
केल्यास अशा अर्जदारांना योजनेतुन रद्दबातल ठरविण्यांत येईल. याची सर्व संबधित
सुशिक्षित बेरोजगार अर्जदारांनी नोंद घ्यावी. असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,
जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment