जळगाव, दि. 8 (जिमाका) :- शेतकऱ्यांचा
आत्मसन्मान वाढून त्यांची उन्नती व सबलीकरण होण्यासाठी पारंपारिक शेती न करता
आधुनिकतेची कास धरून गटशेती केल्यास शेतकरी खऱ्या अर्थाने शेतकरी राजा होईल. असे
प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज केले.
जिल्हाधिकारी
श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हाधिकारी कार्यालयात गटशेती करणारे
शेतकरी, कृषि विभाग, पंचायत समितीचे अधिकारी यांच्या समवेत बैठक संपन्न झाली.
यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, सर्व तालुका
कृषि अधिकारी, गटशेती करणारे लाभार्थी शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
किशोर राजे निंबाळकर पुढे म्हणाले की, बँकांकडून अर्थ सहाय्य मंजूर होण्यासाठी
काही अडचणी असतील त्यावर मार्ग काढण्यात येईल
परंतु शासनाकडील अनुदान व बँकांकडून अर्थ सहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी
नोंदणीकृत गटशेती करणाऱ्या गटांनी आपल्या 20 टक्के वाट्याची तरतूद आधी करून आपल्या बँकेच्या कर्ज
खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे. याचीही संबंधितांनी जाणीव ठेवावी.
जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रारंभी गट शेती विषयी सर्व उपस्थितांना
माहिती करून देतांना सांगितले की, यापुर्वी गटशेती आणि त्यांना लागणाऱ्या
साधनसामुग्रीला यापुर्वी विशेष प्रतिसाद नव्हता. परंतु आता शासनाकडून 60 टक्के
अनुदान मिळत असल्याने गट शेती करणारे गट वाढत असून त्यांची गटशेती व शेती अवजारे,
शेती यांत्रीकी अवजारे इ.खरेदी करण्यासाठी मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
यात
काही गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी गट शेतीचे फायदे , उत्पनातील लक्षणीय वाढ,
रोजगार निर्मिती इत्यादि बाबींचा आवर्जुन उल्लेख केला, व भविष्यात शेतकरी व
संबंधित विभागात चांगला समन्वय राहिल्यास गट शेती करणाऱ्या गटांची संख्या
दिवसेंदिवस वाढत जाईल असेसी विचार मांडलेत.
शेवटी
कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
000000
No comments:
Post a Comment