जळगाव,
दि. 31:- जळगाव
व रावेर येथील आठवडे बाजारातील फेरीवाले यांचेकडील वजनमापांची वैधमापन शास्त्र विभागामार्फत
अचानक तपासणी केली आहे. यामध्ये ज्या फेरीवाल्यांडील वजनमापांत तफावत आढळून आली
अशा आठ फेरीवाल्यांवर वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 अन्वये खटले दाखल करण्यात आले
असून त्यांचेवर पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती श्री. रा. भ.
बांगर, सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र, जळगाव यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी
कार्यालयात झालेल्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या मासिक बैठकीत अशासकीय सदस्यांनी
फेरीवाल्यांकडील वजनमापांविषयी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार वैधमापन शास्त्र विभागामार्फत ही
कारवाई करण्यात आली आहे. यापुढे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तपासणी मोहिम राबविण्यात
येणार आहे. तरी आठवडे बाजारातील फेरीवाले व इतर सर्वांनी आपले जवळील वजने व मापे
यांची नियमित तपासणी जवळील निरीक्षक, वैधमापन शास्त्र यांचे कार्यालयातून करुन
घ्यावी.
याबाबत
काही अडचणी असल्यास किंवा तक्रारी असल्यास दूरध्वनी क्र. 2241149 वर अथवा aclmialgaon@yahoo.in वर संपर्क करावा. असे आवाहन
श्री. बांगर, सहाय्यक नियंत्रक, वैधमापन शास्त्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment