जळगाव,
दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) - मतदान करणे हा प्रत्येक मतदाराचा हक्क आहे. तुमच्या एका
मतानेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होत असल्याने प्रत्येक मतदारांने आपला मतदानाचा
हक्क बजवावा. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी
तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
राष्ट्रीय
मतदार दिवसानिमित्त आज पाचोरा येथील एन. एम. महाविद्यालयात जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर हे अध्यक्षस्थानावरून
बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे
(निवडणूक), पाचोऱ्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलीस अधिकारी केशव
पातोंड, तहसीलदार श्री. बी. ए. कापसे, (पाचोरा), श्री. सी. एम. वाघ (भडगाव), प्राचार्य
श्री. पाटील, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, (पाचोरा) श्रीमती दिपाली कोतवाल (भडगाव)
नायब तहसीलदार निवडणूक श्री. कळसकर, आदि उपस्थित् होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस
नगरदेवळा येथील शाहिर शिवाजीराव पाटील यांनी पोवाडा सादर केला.
जिल्हा
निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले, प्रत्येक मतदाराने मतदान
करून अन्य मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी
व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात 1 लाख 45 हजार नवमतदारांची
वाढ झाली आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक- युवतींनी मतदार म्हणून नोंदणी करावी.
जिल्ह्यात 13 हजार 916 दिव्यांग मतदार आहेत. त्यांना निवडणूक आयोगाने विशेष व्यक्तींचा
दर्जा दिला आहे. दिव्यांग व वृध्द व्यक्तींना मतदानासाठी विविध सुविधा उपलब्ध करून
देण्यात येतील, कोणीही मतदार या निवडणूकीत मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता
प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे. तथापि, मतदारांनीही आपली जबाबदारी ओळखून मतदानाचा पवित्र
हक्क बजवावा. या निवडणूकीमध्ये बॅलेट युनिट, कंट्रोल युनिटसोबत व्हीव्हीपॅट मशीन बसविण्यात
येणार असल्यामुळे मतदारांना आपण कोणत्या उमेदवारांस मतदान केले हे दिसणार आहे. निवडणूक
आयोगाचे कोणतेही मशीन हॅक करता येत नाही. त्यामुळे मतदारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास
ठेवू नये. मतदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी 1950 हा टोलफ्री क्रमांक सुरु करण्यात
आला आहे. त्याचबरोबर सुगम, सुविधा आणि समाधान या सेवा सर्वांसाठी सुरु करण्यात आल्या
आहेत. त्यामुळे सर्वांनी येत्या निवडणूकांमध्ये निपक्ष:पातीपणे व निर्भयपणे मतदान करण्याचा
संकल्प करावा. असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी उपस्थितांना केले.
उप
विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे म्हणाले, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची
स्थापना झाली. 2011 पासून दरवर्षी आजचा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला
जातो. आजच्या दिवशी जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वयाची 18
वर्षे पूर्ण केलेले मतदार, दिव्यांग मतदार नोंदणीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात
येत आहेत. महाविद्यालयात ELC क्लब स्थापन करण्यात आले आहेत. याशिवाय इ. एल. फोरम, चुनाव
पाठशाला या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अपर पोलीस अधिक्षक श्री. बच्छाव यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी
देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करणे आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू अशा आशयाची
शपथ जिल्हाधिकारी यांनी सर्व उपस्थितांना दिली.
प्रा.
अतुल सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. तहसीलदार श्री कापसे यांनी आभार मानले. यावेळी
महाविद्यालयाचे पदाधिकारी, प्रांत व तहसील कार्यालयाचे कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी,
नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेते व उत्कृष्ट
बीएलओंचा गौरव
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध स्पर्धांचे
आयोजन करण्यात आले होते. त्यात निबंध, वक्तृत्व, रांगोळी, घोषवाक्य, चित्रकला आदी स्पर्धांचा
समावेश होता. या स्पर्धेतील विजेत्यांसह मतदार नोंदणीत उत्कृष्ट कार्य करणारे बीएलओ
चोपडा-श्री. धमेंद्र हिरालाल पाटील, रावेर-श्री. प्रमोद दत्तू पाटील, भुसावळ-
श्री. अविनाश शालीग्राम देशमुख, जळगाव शहर- श्री. आर. बी. संदानशिव, जळगाव
ग्रामिण- श्री. एस. एम. देशमुख, अमळनेर- श्री. दिनेश रमेश मोरे, एरंडोल - श्री.
भुषण दगडू पाटील, चाळीसगाव- श्री.संभाजी महादू पाटील, पाचोरा- श्री.रामदास ओंकार
खरे, जामनेर- तन्वीर अहमद शेख रौफ, मुक्ताईनगर- श्री विकास ज्ञानदेव पाटील,
स्वातंत्र्यसैनिक उत्तमराव देसले गुरुजी (भडगाव) कृषिभूषण विश्वास पाटील यांचा जिल्हाधिकारी श्री.
निंबाळकर यांच्या हस्ते सन्मापत्र देवून गौरव करण्यात आला.
000
No comments:
Post a Comment