Monday, 14 January 2019

जळगाव जिल्ह्यात रेशीम शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक सुविधा उपलबध करुन देणार - मुख्यमंत्री

 

 * जळगाव जिल्हा कृषि क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारा जिल्हा

* ठिबक सिंचनात जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर

        जळगांव, दि. 14 : जळगाव जिल्हा कृषि क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारा जिल्हा आहे. ठिबक सिंचनात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. या जिल्ह्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. त्यात अधिकाधिक वाढ होण्यासाठी रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याकरीता आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. याबाबतच्या सुचना जिल्हा प्रशासनाला देण्यात येईल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकसंवाद कार्यक्रमात केले.
            कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी बोलत होते. यावेळी जिल्ह्यातून प्रशांत नरेंद्र  सरोदे, बामणोद, ता. यावल, अभय प्रभाकर महाजन, कोळवद, ता. यावल, गजानन कडू जंगले, येवती, ता. बोदवड, संदिप शिवाजी पाटील, फेसर्डी, ता. जळगाव, मधुकर पाटील, सुनसगाव, ता. जामनेर, अनंतराव पाटील, राजूरी, ता. पाचोरा या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
         यावेळी सुनसगाव, ता. जामनेर येथील शेतकरी मधुकर पाटील यांनी गेल्या चार वर्षांपासून रेशीम शेती करीत आहे. बदलत्या वातावरणात शाश्वत उत्पादनाचा स्त्रोत निर्माण झाल्यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात रेशीम शेतीचे प्रमाण कमी असल्याने येथील शेतकरी रेशीम शेती करण्यासाठी उत्सुकता दाखवत नाही. शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, यासाठी त्यांना तांत्रीक स्वरुपाच्या माहिती सोबतच येणाऱ्या उत्पादन विक्रीचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यासाठी रेशीम शेती कार्यालयाला प्रशासकीय मान्यता मिळावी. धागा निर्मिती प्रक्रिया केंद्र सुरु करणे, तसेच शेतमालाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी श्री. पाटील यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री. पाटील यांच्या मागणी बाबत तात्काळ जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना लवकरात लवकर व्यवस्था करण्याची सूचना देण्यात  येईल असे सांगितले.
मुख्यमंत्री साहेब माझे कुटूंबीय आपले अत्यंत आभारी आहे
        कृषि यांत्रिकीकरण योजनेमुळे माझे आठ दिवसाचे काम दोन दिवसात पूर्ण होवू लागले. त्यामुळे माझ्या कष्टात व मजूरीत मोठया प्रमाणात बचत झाल्याने माझे उत्पन्नही वाढले आहे. याबद्दल मुख्यमंत्री साहेब मी व माझे कुटूंबीय आपले अत्यंत आभारी आहे. असे भावनिक उद्गार राजूरी, ता. पाचोरा येथील शेतकरी अनंतराव एकनाथ पाटील यांनी व्यक्त केले.
        श्री. पाटील यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंगतर्गत ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पॉवर टिलर ही औजारे मिळाली. त्यामुळे माझी शेतीच्या मशागतीची कामे अधिक वेगाने होवू लागली आहे. माझी पत्नी सौ. वैशाली पाटील हिलाही फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळाल्यामुळे आमच्या कुटूंबाचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे. आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते की, आम्ही मुख्यमंत्र्यांशी कधी बोलू शकू. परंतु आज आपणाशी बोलल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. असे मनोगत श्री. व सौ. पाटील यांनी त्यांच्या शेतातूनच मुख्यमंत्री महोदयांशी थेटसंवाद साधताना व्यक्त केले.
         रमेश नथ्थू शेले, काळखेडा, ता. जामनेर यांना बिरसामुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत नविन विहिर, ईलेक्ट्रीक पंप संच, सूक्ष्म सिंचन संच यांचा लाभ मिळाल्यामुळे कोरडवाहू शेतीचे बागाईती शेतीमध्ये रुपांतर झाले. त्यामुळे तिनही हंगामात पिक घेता येत असल्याने उत्पन्नात वाढ होवून आर्थिक स्तर सुधारल्याचे सांगितले.
          रावेर तालुक्यातील राहुल रमेश पाटील यांनी सुक्ष्मसिंचन योजनेचा लाभ घेतल्याने पाण्याची बचत झाली. त्यामुळे वहिती खालील क्षेत्र वाढले व परिणामी उत्पादनात वाढ झाल्याचे सांगितले. तसेच केळीसाठी जळगाव जिल्हा प्रसिध्द असल्याने केळीच्या निर्यातीला शासनामार्फत सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
             गजानन कडू जंगले, येवती, ता. बोदवड यांनी शेडनेट, रोपवाटीका शासनाच्या मदतीने उभारल्याने त्या अंतर्गत नियंत्रित वातावरणामुळे पिकाचा दर्जा सुधारल्याने बाजारभाव चांगला मिळत आहे. यासाठी श्री. जंगले यांनी शासनाला धन्यवाद दिले. 
            नामदेव बाजीराव पाटील, बांभोरी, ता. धरणगाव यांनी पॉलीहाऊसच्या अंतर्गत रंगीत ढोबळी मिर्चीचे उत्पादन घेतले आहे. या रंगीत ढोबळी मिर्चीला मुंबई, सुरत बाजारात पाठविण्यात येते. तसेच यावेळी श्री पाटील यांनी ढोबळी मिर्ची काही प्रमाणात खराब होते त्यावर उपाययोजनेसाठी मार्गदर्शन मिळण्याची मागणी केली.
लोकसंवाद या कार्यमक्रमात जिल्ह्यतील प्रशांत नरेंद सरोदे, बामणोद, अभय प्रभाकर महाजन, कोळवद, ता. यावल, गजानन कडु जंगले, येवती, ता. बोदवड, संदीप शिवाजी पाटील, फेसर्डी, ता. जळगाव, अनंतराव एकनाथ पाटील, राजुरी, ता. पाचोरा, नामदेव बाजीराव पाटील, बांभोरी, ता. धरणगाव, गुलाब विठ्ठल जाधव, शिंदी, ता. चाळीसगाव, दिपक राजाराम गायकवाड, वडगाव तिघ्रे, रमेश नथ्थु शेले, काळखेडा, मधुकर पाटील, सुनसगाव, ता. जामनेर, राहूल रमेश पाटील, बारवाडी, ता. रावेर, पंकज संतोष घटे, कोठे, ता. मुक्ताईनगर हे शेतकरी सहभागी झाले होते.
०००

No comments:

Post a Comment