जळगाव दि.8 (जिमाका)- गोवर रुबेला सारखे जीवघेण्या
आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी लसीकरणाचे काम हे एक राष्ट्रीय कर्तव्याच्या
जाणीवेतून पार पाडावे. तेव्हाच गोवर रूबेला सारख्या रोगाचे जिल्ह्यातून 100 टक्के
उच्चाटन होवू शकेल. शिवाय हे काम युद्ध पातळीवर करावयाचे असून 16 जानेवारी पर्यंत जिल्ह्यात हे काम पूर्ण
झाले पाहिजे. अशा सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना त्यांच्या दालनात
आयोजित बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांना केल्या.
याप्रसंगी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. कमलापूरकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रफिक
तडवी, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.प्रकाश नादापुरकर , महिला व बाल विकास अधिकारी
श्रीमती बागुल, उप शिक्षणाधिकारी गायकवाड, नेटकर, विजय पवार, महानगर पालिका
आरोग्याधिकारी श्रीमती उगले, अंगणवाडी पर्यवेक्षिका, शिक्षण विस्तार अधिकारी आदि
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी
आरोग्य विभागाकडून गोवर-रुबेला या रोगाची
गांभिर्यता दर्शविणारे सादरीकरण करण्यात आले.
गोवर रुबेला या रोगाचे भारतात जगाच्या तुलनेत 1/3 एवढे भयंकर प्रमाण असल्याचे सांगून गर्भवती
महिलेस गर्भावस्थेत हा रोग झाल्यास सदर महिलेचे
अपत्य हे मृत अवस्थेत होण्याची शक्यता असते.
जिल्ह्यातील
एकूण 3300 शाळांमधून गोवर –रुबेला लस 9 महिने ते 15 वर्ष या दरम्यानच्या मुलांना
देणे सूरू आहे. गोवर रुबेला लसीकरणाची मोहिम ही पल्स पोलिओच्या 3 पट वेगाने
केल्यासच गोवरचे पुर्णपणे उच्चाटन व रूबेलाला प्रतिबंध करणे शक्य होईल असेही
आयोजित चित्रफितीतून दाखविण्यात आले.
गोवर
–रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थी –पालक,
अधिकारी-पदाधिकारी यांच्या समन्वयाने व प्रसंगी उदिष्ट पूर्ण करण्यासाठी नजिकच्या
पोलिस स्टेशन कडून पोलीस बंदोबस्त घेवा, जनजागृती करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी
यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य
अधिकारी यांचेसह सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.
0000
No comments:
Post a Comment