जळगाव दि. 25 - प्रधानमंत्री नरेंद्र
मोदी यांच्या ‘संकल्प से सिध्दी’ या उपक्रमातंर्गत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न
2022 पर्यंत दुप्पट होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर आधारीत राज्याच्या कृषि
विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवले आणि आयुक्त कृषि श्री. सचिन्द्र प्रताप सिंह
यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली कृषि विभागाच्या चित्ररथाचे संचलन 26
जानेवारी, 2019 रोजी शिवाजी पार्क, मुंबई येथे मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री
यांचे उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये होणार आहे.
राज्यात खरीप व रब्बी हंगामापुर्वीच शेतकऱ्यांना मृद आरोग्य
पत्रिकेचे वितरण, शिफारशीनुसार खतांचा वापर, दर्जेदार बियाणे व खते यांची उपलब्धता
करुन देण्यात येत आहे. रोहिणी नक्षत्राच्या कालावधीत राज्यातील सर्व गावांमध्ये
कृषि जनजागृती पंधरवडा साजरा झाला. या कालावधीत कृषि विभाग व कृषि विद्यापीठाच्या
तंज्ञामार्फत शेतावर प्रत्यक्ष भेटी, शेतकरी मेळावे, सभा, चर्चासत्रे इत्यादीच्या
माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत अधिसुचित
करण्यात आलेल्या पीकांचा व फळपीकांचा विमा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी
गावपातळीवर मोहिम राबविण्यात आलेली आहे.
प्रती थेंब अधिक पिक हे ध्येय ठेवून ठिबक सिंचनावर तसेच मजुर टंचाईवर मात
करण्यासाठी आणि उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषि यांत्रिकीकरणावर भर देण्यात
येत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी योजनेत सुलभता व
पारदर्शकता आणली आहे.
शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी स्वच्छता आणि प्रतवारी
करणे, उत्पादित शेत मालाचे मुल्यवर्धन करणेसाठी प्रोत्साहन देणे, काढणीपश्चात शेत
मालाचे नुकसान होऊ नये म्हणून गोदामे व शितगृहांचे उभारणीसाठी मोठयाप्रमाणात
गुंतवणूक करण्यात येत आहे. कुक्कटपालन, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय व मधुमक्षिका
पालन या सारख्या शेती पुरक व्यवसायांना मोठया प्रमाणात चालना देण्यात आली
आहे.
गट शेतीच्या माध्यमातून
कमी खर्चात जास्तीत जास्त उच्च दर्जाचे उत्पादन व विक्री करुन राज्यातील शेती आणि
शेतकरी समृध्द होण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. अशा सर्व घटकांचा एकात्मिक
दृष्य दर्शवीणारा कृषि विभागाच्या या चित्ररथाची उभारणी मे.प्रसिध्दी ॲडव्हर्टाइज,
पुणे यांनी केली आहे.
000
No comments:
Post a Comment