Friday, 26 October 2018

दुष्काळ सदृश्य परिस्थितीतील गावांना 100 टक्के अनुदानांवर वैरण बियाणे उपलब्ध होणार


       जळगाव, दि.26:-   संभाव्य टंचाई काळात चारा उपलब्ध होण्यासाठी  राज्य शासनाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. आहे. सदर उपलब्घ निधीतून दुष्काळ सदृश्य परिस्थितीतील तालुक्यांमध्ये सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्य शेतकरी / पशुपालकांना वैरणीची बियाणे व खते 100 टक्के अनुदानावर वितरीत करण्यात येणार आहेत. या योजनेमध्ये कमीतकमी 10 गुंठे क्षेत्राकरिता अनुदान मर्यादा 460/- असून प्रती शेतकरी अनुदानाची अधिकतम मर्यादा एक हेक्टर क्षेत्रासाठी 4600/- एवढी आहे. या योजनेमधून 8.7 लक्ष मेट्रीक टन हिरव्या वैरणीचे उत्पादन अपेक्षित आहे.
        संपूर्ण योजनेची अंमलबजावणी माहे नोव्हेंबर 2018 मध्ये करण्यात येणार आहे. योजनेच्या लाभासाठी पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समिती कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्याल्य यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. 
००

No comments:

Post a Comment