Monday, 29 October 2018

टंचाईग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी वैरण बियाणे व खते वितरण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


जळगाव, दि.29:-  राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत राज्यातील संभाव्य चारा टंचाईची तीव्रता कमी करण्याकरीता वैरण बियाणे व खते वितरण करण्यात येत आहे.  या योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील टंचाईग्रस्त तालुक्यातील सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या पशुपालक / शेतकरी यांना वैरण बियाणे व खते वितरण करणेसाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असलेल्या टंचाईग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेशी संपर्क साधून तालुकास्तरावर दिनांक २९ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 
000

No comments:

Post a Comment