Monday, 29 October 2018

फळपिक विमा योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत


             जळगाव, दि.29:-  प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना जिल्ह्यात सन 2018-19 करीता अंबिया बहाराकरिता अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी राबविण्यात येत आहे.
            या योजनेत केळी पिकासाठी भाग घेण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2018 अशी आहे. केळी फळपीक विम्यासाठी बिगर कर्जदार शेतक-यांनी जिल्हयातील जन सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात यावे.
            जिल्ह्यात तालुक्यानिहाय जनसुविधा केंद्र उपलब्ध आहेत. 
जळगाव – 129, भुसावळ - 21, बोदवड- 10, यावल - 24, रावेर - 19, मुक्ताईनगर- 18, अमळनेर- 23, चोपडा - 22, एरंडोल - 16, धरणगाव - 14, पारोळा - 13, चाळीसगाव -30, जामनेर- 32, पाचोरा – 25, भडगाव - 17 अशी एकूण – 413  केंद्र आहे.
            या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.
                                                                      ०००

No comments:

Post a Comment