जळगाव,
दि.29:- प्रधानमंत्री फसल बीमा
योजनेअंतर्गत हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना जिल्ह्यात सन 2018-19 करीता
अंबिया बहाराकरिता अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी राबविण्यात येत आहे.
या
योजनेत केळी पिकासाठी भाग घेण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2018 अशी आहे. केळी
फळपीक विम्यासाठी बिगर कर्जदार शेतक-यांनी जिल्हयातील जन सुविधा केंद्रामार्फत
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात यावे.
जिल्ह्यात
तालुक्यानिहाय जनसुविधा केंद्र उपलब्ध आहेत.
जळगाव – 129,
भुसावळ - 21, बोदवड- 10, यावल - 24, रावेर - 19, मुक्ताईनगर- 18, अमळनेर- 23,
चोपडा - 22, एरंडोल - 16, धरणगाव - 14, पारोळा - 13, चाळीसगाव -30, जामनेर- 32,
पाचोरा – 25, भडगाव - 17 अशी एकूण – 413
केंद्र आहे.
या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ
घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे
केले आहे.
०००
No comments:
Post a Comment