Tuesday, 23 October 2018

जिल्ह्यातील चारा लगतच्या जिल्ह्यात किंवा राज्यात वाहतुक करण्यास निर्बंध

         जळगाव, दि. 23 -  जिल्हयात संभाव्य चारा टंचाईची शक्यता लक्षात घेता व पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध नसल्याने भविष्यात उत्पन्न होणा-या चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेता सदर परिस्थितीवर मात करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील चारा, लगतच्या जिल्ह्यात किंवा लगतच्या राज्यात वाहतुक करण्यास निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर  यांनी दिले आहे.
               या आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्ती विरुध्द / संस्थेविरुध्द फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. सदरचा आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार संबंधितावर नोटीस बजविणेसाठी पुरेसा कालावधी उपलब्ध नसल्याने टंचाईच्या परिस्थितीत एकतर्फी काढण्यात येत आहे. सदरचा आदेश हा 20 ऑक्टोबर, 2018 पासून (आदेशाच्या दिनांकापासून) 60 दिवसाच्या कालावधीसाठी लागू राहील. असे जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
                                                                      ०००

No comments:

Post a Comment