जळगाव,
दि. 22 - विविध कारणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुंटूंबियांना आर्थिक
मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या समितीपुढे एकूण 11
प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी सात प्रकरणे मंजूर करण्यात आली असून एक प्रकरण
नामंजूर करण्यात आले आहे. तर तीन प्रकरणांवर फेरचौकशी करण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
या
बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या सात शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख
रुपयांची आर्थिक मदत देणेबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, नायब तहसीलदार अशोक लाडवंजारी यांचेसह
अशासकीय सदस्य उपस्थित होते.
या
बैठकीत मनोज बापू चौधरी, पारोळा, बाळू पुंडलिक कोळी, रा. गोरगांवले खु. ता. चोपडा,
सोपान सिताराम धायडे (कोळी) रा. चिंचखेडा, ता. मुक्ताईनगर, जगदीश गणपत रुढे, रा.
पळासखेडे काकर, ता. जामनेर, धनराज ऊर्फ सुनिल भावराव मोरे, रा. मोयखेडा दिगर, ता.
जामनेर, अशोक लक्ष्मण पाटील, रा. कर्की, ता. मुक्ताईनगर, गोविंदा राजाराम तायडे,
रा. हरताळे, ता. मुक्ताईनगर या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना शासन नियमान्वये आर्थिक
मदत देण्यात येणार आहे.
00000
No comments:
Post a Comment