Thursday, 11 January 2018

बाल हक्क संरक्षण कायद्याचा समाजहितासाठी वापर होणे आवश्यक - श्री. अ. ना. त्रिपाठी



     
         जळगाव, दि.11 -  बालकांच्या हक्काबाबत जागृत राहून  बाल हक्क संरक्षण कायद्याचा वापर सामाजिक हितासाठीच होणे आवश्यक आहे. या कायद्याच्या वापराबाबत यंत्रणेने जागृत राहून लक्ष ठेवावे. असे आवाहन बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव  (प्रधान सचिव दर्जा) श्री. अ. ना. त्रिपाठी यांनी केले.

         बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव श्री. अ. ना. त्रिपाठी  यांनी आज पोलीस कवायत मैदानाजवळील मंगलमय सभागृहात बाल हक्क संरक्षण कायदा तसेच  बालकांच्या हक्काबाबत असलेल्या इतर विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.   बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 बालकांचे लैगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012, अनैतिक व्यापार प्रतिंबंधक अधिनियम 1956 बालकामगार प्रतिबंधक 2016 च्या अंमलबजावणीच्या संदर्भातील आयोगाने करावयाच्या मॉनेटरींग संदर्भातील संबंधीत अधिनियमातील विविध तरतुदी व कायदे या संदर्भात विविध विषयावर स्पष्टीकरणासह उदाहरण देवून मार्गदर्शन केले.
            बैठकीसाठी  राहुल मुंडके, निवासी उप जिल्हाधिकारी, आर. एस. तडवी, पोलिस उपअधिक्षक (गृह),  सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी,  रमेश काटकर, एकातिम्क आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक आर. बी. हिवाळे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्रीमती वृषाली कोल्हे, अध्यक्षा, बाल कल्याण समिती, डॉ. वाय.जी. महाजन, डॉ. नीरज देव व श्रीमती माया काळे, सदस्य बाल कल्याण समिती, सहाय्यक कामगार आयुक्त, सहा. आयुक्त समाज कल्याण, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत काम करणारे सर्व तपासी अधिकारी, विशेष पोलिस पथकातील ज्युव्हेनाईल वेल्फेअर अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी श्री. त्रिपाठी यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलीस कर्मचारी यांना सीआरपीसी  कायदा, सीडब्ल्युसी कायदा, कामगार कायदा आदिबाबत उदाहरणासह मार्गदर्शन केले. तसेच चाईल्ड केसेस संदर्भात जनजागृती करण्यासाठी ग्रामीण स्तरावर ग्रामसेवकांना याबद्दल जिल्हास्तरावरुन मार्गदर्शन करण्यास संबधित यंत्रणेला सूचना देऊन विविध विभागांच्या अडीअडचणी व त्यावरील उपाय या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच विविध कायद्यांतर्गत काम करणा-या संबंधित अधिका-यांना काम करत असतांना येणा-या अडचणी / समस्या जाणून घेतल्या.     
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश काटकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले. उपस्थितांचे आभार  एस.आर.पाटील, जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांनी केले. कार्यक्रमास पोलीस, समाजकल्याण, महिला व बालविकास, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
०००००

No comments:

Post a Comment