जळगाव, दि.29 - बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत कुठल्याही प्रकारचे
वैयक्तिक लाभ दिले जात नाहीत. मात्र तरीही काही दलाल या अभियानातंर्गत वैयक्तिक
लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली नागरीकांची फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले
आहे. अशा कुठल्याही गोष्टींना नागरीकांनी बळी पडू नये. असे आवाहन रमेश काटकर,
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
मुलींची संख्या कमी असलेल्या भारतातील 160
जिल्ह्यापैकी व महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांपैकी एक असणा-या जळगाव जिल्ह्यात
केंद्र शासनाने बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची सुरवात केलेली आहे. सदर अभियानाचे
उद्दिष्ट हे समाजात मुलींप्रती असणारी मानसिकता बदलणे व मुलींना सुरक्षितता,
शिक्षण व पोषण देणेबाबत समाजामध्ये जागृती निर्माण करणे हेच असल्याने नागरीकांनी
कुठल्याही अमिषाला बळी पडू नये.
000
No comments:
Post a Comment