·
नशीराबाद ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठापर्यंतच्या समांतर रस्त्यांसाठी 100
कोटी रुपयांची तरतूद. प्रारुप आराखडा तयार करण्याचे काम सुरु
·
भुसावळ ते पुणे व्हाया मनमाड- अहमदनगर रेल्वे सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार.
·
येत्या वर्षभरात जळगावकरांना दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी
प्रयत्न करणार
·
महापालिकेची एक शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित करुन त्यामध्ये सर्वसामान्य
मुलांना शिक्षणाची सोय करणार
·
शहराच्या स्वच्छतेसाठी 30 कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे.
यामध्ये कचऱ्यासाठी घंटागाड्या खरेदी करण्यात येणार
·
जिल्ह्यातील तरुणांचे कौशल्य विकसित करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या
माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी प्रशिक्षणाबरोबरच मुद्रा
योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करुन देणार.
·
जळगाव, भुसावळ, चाळीसगाव येथे कृषि, दाळ,प्लॅस्टिक व चटई उद्योग वाढण्यासाठी
प्रयत्न.
·
जामनेर टेक्सटाईल पार्कसाठी जमीनीचा ताबा एमआयडीसी कडे देण्यात आला.
·
शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी अजिंठा चौफुलीचे काम येत्या 15
दिवसात सुरु करणार
·
ठेवींदाराच्या प्रश्नाबाबत पुढील महिन्यापासून धडक मोहिम राबविणार
·
शहरातील मालमत्तांचे सॅटेलाईटद्वारे मॅपिंग केल्यामुळे मनापाचे उत्पन्न 140
कोटी रुपयांनी वाढणार.
जळगाव,
दि. 6 - शहर स्वच्छ, सुंदर असेल तर नागरीकांचे आरोग्यही चांगले राहते. जळगाव हे
देशातील महत्वपूर्ण शहर असल्याने या शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न
सुरु असून यावर्षी जळगाव ला इंदूरच्या धर्तीवर स्वच्छ व सुंदर शहर बनविणार
असल्याचा संकल्प जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.
राज्य
शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातंर्गत जिल्हा माहिती कार्यालय, जळगावतर्फे
आयोजित ‘सिध्दी 2017 व संकल्प 2018’
या उपक्रमातंर्गत पत्रकार दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार
परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी येत्या वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात
येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या पत्रकार परिषदेस जिल्हा पोलीस अधिक्षक
दत्तात्रय कराळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा माहिती
अधिकारी विलास बोडके आदि उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकार दिनानिमित्ताने उपस्थित
सर्व पत्रकारांचा जिल्हाधिकारी यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी राज्य शासनाच्यावतीने जिल्ह्यात गेल्या
वर्षभरात करण्यात आलेल्या व या वर्षात करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची
माहिती दिली.
·
मागेल
त्याला शेततळे
जिल्ह्याला 2
हजार शेततळ्यांचा लक्षांक देण्यात आला होता. यापैकी 1709 शेततळी पूर्ण. यासाठी 8
कोटी 26 लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. शेततळी पूर्ण करण्याच्या कामात जळगाव जिल्हा
राज्यात पहिल्या क्रमांकावर.
·
छत्रपती
शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
शेतकरी
कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील 2 लाख 43 हजार 577 शेतकरी कुटूबांनी कर्जमाफीसाठी 968
केंद्रावर ऑनलाईन अर्ज भरले. त्यापैकी 1 लाख 68 हजार 792 शेतकऱ्यांच्या खात्यावर
535.85 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली. 65 हजार शेतकऱ्यांना
एसएमएसद्वारे तसे कळविण्यात आले आहे.
·
उन्नत
शेती समृध्द शेतकरी कृषि यांत्रिकीकरण मोहिम
कृषि
यांत्रिकीकरण प्रकल्प व फलोत्पादन यांत्रिकीकरणासाठी टॅ्रक्टर व कृषि औजारांसाठी 6
कोटी 15 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. आजपर्यंत 272 ट्रॅक्टर व 428 औजारांचे
वाटप करण्यात आले. यावर 4 कोटी 70 लाख रुपये खर्च करण्यात आला. या योजनेस जिल्हयात
वाढता प्रतिसाद पाहता 3 कोटी 11 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे.
·
कापूस
पिकावरील गुलाबी बोंडअळी
जिल्हयात 2 लाख
56 हजार 440 हेक्टर क्षेत्रासाठी 2 लाख 77 हजार 689 शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त
झाल्या आहेत. यापैकी 33 हजार 453
शेतकऱ्यांच्या 31 हजार 322 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले
आहे.
·
प्रधानमंत्री
कृषि सिंचन योजनेतंर्गत सुक्ष्म सिंचन योजना
11 हजार 244
लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आली असून त्यापैकी 5482 लाभार्थ्यांना 23 कोटी
29 लाख रुपयांचे अनुदान बँक खात्यावर जमा
करण्यात आले आहे.
·
खरीप
हंगाम 2017-18 आधारभूत किंमत खरेदी केंद्र
उडीद, मुग,
सोयाबीन या कडधान्यासाठी अमळनेर, जळगाव व
पाचोरा येथे 3 खरेदी केंद्र, भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यात 16 खरेदी केंद्र तर
कापूस खरेदी साठी 8 खरेदी केंद्रांना मंजूरी देण्यात आली.
·
जलयुक्त
शिवार अभियान
सन 2015-16 मध्ये
232 गावांची निवड. यासाठी 127 कोटी रुपये
निधी खर्च करण्यात आला. या गावांमध्ये 7404 कामे पूर्ण झाली आहे. यामुळे जिल्ह्यात
36118 टीसीएम साठवण क्षमता निर्माण झाली आहे. यामुळे 58667 हेक्टर क्षेत्राला एक पाण्याची
पाळी देता येणार आहे.
सन 2016-17 मध्ये
222 गावांची निवड. यासाठी 146 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये 4856 कामांचा समावेश असून यापैकी 4402 कामे पूर्ण झाली आहे. तर 460 कामे
प्रगतीपथावर आहे. यासाठी 131 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून आतापर्यत 91.34
कोटी रुपये खर्च झाला आहे.
सन 2017-18 मध्ये
206 गावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी 96 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला.
यापैकी 82.98 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामधून 4343 कामे करण्यात येणार
आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे या गावांची पाणी पातळी 1.6 मीटरने वाढ झाली. स्क्षूम
(ठिबक व तुषार) सिंचनात जळगाव जिल्हा देशात पहिल्या क्रमांकावर. जलयुक्त शिवार
अभियानामुळे जिल्ह्यात शाश्वत सिंचन निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे
·
मनेरगा
अतंर्गत धडक सिंचन विहिर कार्यक्रम
जिल्ह्याला 3800
विहिरींचे लक्षांक देण्यात आला आहे. यापैकी 3578 विहिरीचे काम सुरु आहे. यासाठी
14.51 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
·
राष्ट्रीय
महामार्ग क्र. 6 (नागपूर ते सुरत)
चिखली ते तरसोद
62.700 किमी रस्त्यासाठी 86 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण. येत्या 15 दिवसांत काम
पूर्ण सुरु होणार.
तरसोद ते फागणे
87.300 किमी रस्त्यासाठी 99 टक्के
भूसंपादन पूर्ण पूर्ण.
एकूण 150 किमी साठी
1888 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पाळधी ते फागणे
या दरम्यानच्या रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरु मे 2019 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्ष्टि.
धुळे-चाळीसगाव-औरंगाबाद
रस्त्याच्या कामाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.
लवकरच कामास सुरुवात होणार.
जिल्हा
परिषदेच्या अखत्यारितील 8330 किमी लांबीच्या रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी
सन 2016-17 मध्ये 11.09 कोटी तर सन 2017-18 मध्ये 13.21 कोटी रुपये निधी
जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करुन देण्यात आला.
मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेतंर्गत जिल्ह्यात 254 किमी लांबीची 133 कोटी रुपये खर्चाची 40 कामे
सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील 163 गावे जोडली जाणार आहे. यापैकी 11 कामे पूर्ण
झाली आहे तर 25 कामे प्रगतीपथावर आहे.
·
कृषीपंपाना
वीज जोडणी
जिल्ह्यात एप्रिल
2015 पर्यंत वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या 9396 अर्जापैकी 4146 वीज जोडण्यात
देण्यात आल्या आहेत. 2015-16 मध्ये प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 2199 तर 2016-17
मधील प्राप्त अर्जापैकी 1755 कृषिपंपाना वीज जोडण्या देण्यात आल्या.
·
सौर
उर्जाद्वारे विद्युतीकरण
अंबापाणी येथील
123, चारमळी येथील 30, रुईखेडा येथील 23 घरांचे 68.25 रुपये खर्च करुन सौर
उर्जाद्वारे विद्युतीकरण करण्यात आले.
·
प्रधानमंत्री
आवास योजना
सन 2016-17 मध्ये
जिल्ह्याला(ग्रामीण) 12557 घरकुलांचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यापैकी 12605
प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून 12459 घरांची कामे सुरु आहे. तर सन 2017-18 मध्ये
10097 घरांचा लक्षांक असुन त्यापैकी 4041 मंजूर करण्यात आली आहे तर 1187 घरांचे
काम सुरु आहे.
जिल्ह्यातील एक
महानगरपालिका, 14 नगरपालिका, 3 नगरपंचायतीसाठी 46196 घरकुलांचा लक्षांक देण्यात
आला आहे. 12461 झोपड्यांचे नंबरींग पूर्ण. 352 घरांचा 18.39 कोटी रुपयांचा
प्रस्ताव शासनास सादर. 156 घरांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात. तर मेहरुण व पिंप्राळे
शिवारात 1100 घरकुले बांधण्याचा प्रस्ताव आहे.
·
स्वच्छ
महाराष्ट्र अभियान
जिल्ह्यात 1149
ग्रामपंचायती असून त्यापैकी 546 ग्रामपंचायती संपूर्ण हागणदारमुक्त घोषित करण्यात
आल्या आहे. मार्च अखेर उर्वरित ग्रामपंचायती हागणदारीमुक्त होणार आहे. जिल्ह्यात 3
लाख 47 हजार 728 कुटूंबाकडे वैयक्तिक शौचालय आहे. उर्वरित 1 लाख 40 हजार 219
शौचालये बांधण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
·
जळगाव
महानगरपालिका
शहरात मुलभूत
सोईसुविधांसाठी 25 कोटी रुपये अनुदान
प्राप्त. प्रस्ताव मा. विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी सादर
अमृत पाणीपुरवठा
योजनेसाठी 249 कोटी रुपये मंजूर
अमृत मलनिस्सारण
योजनेसाठी 138 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूरीसाठी राज्यस्तरीय समितीकडे सादर
भुसावळ नगरपालिकेला
अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी 90.84 कोटी रुपये मंजूर. योजनेचे भुमिपुजन संपन्न झाले
असून काम सुरु.
पोलीस विभागाच्या नऊ सेवा ऑनलाईन
- जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे
शहरातील वाहतुककोंडी दूर
करण्यासाठी पोलीस विभागाच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. नागरीकांच्या
तक्रारी सोडविण्यासाठी सिटीझन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलमुळे
नागरीकांना तक्रारीसाठी पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता भासणार नाही तर नागरीक
ऑनलाईन तक्रार करु शकतात. गुन्हे रोखण्यासाठी व गुन्हेगारांना कठोर शिक्षा
होण्यासाठी पोलीस विभागातर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. तसेच
सेवा हमी कायद्यातंर्गत पोलीस विभागातर्फे नागरीकांना देण्यात येणाऱ्या विविध
सेवांपैकी 9 सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. यासाठी नागरीकांना आता पोलीस
स्टेशनला येण्याची आवश्यकता भासणार नसल्याचेही श्री. कराळे यांनी सांगितले.
|
·
मेडिकल हब
जिल्हयात मेडिकल
हब ला मान्यता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एप्रिल 2018 पासून प्रवेश सुरु.
महाविद्यालयासाठी चिंचोली शिवारात 100 एकर जमीन देण्यात आली आहे.
·
संभाव्य
पाणी टंचाई कृती आराखडा - 859 गावांसाठी 29.50 कोटी रुपयांचा टंचाईकृती आराखडा
तयार करण्यात आला आहे. 40 गावांना 19 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. 44
गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहे.
·
नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ
अधिकारी यांना लॅपटॉप व प्रिंटर पुरविण्यात आले आहे.
·
उडाण योजनेतंर्गत जळगाव मुंबई विमानसेवेस सुरुवात.
·
शहरातील
बंदिस्त नाट्यगृह
शहरातील बंदिस्त
नाटयगृहाच्या 30 कोटी रुपये खर्चाचे इमारतीचे बांधकाम पूर्ण, अंतर्गत रंगकाम व इतर
कामे प्रगतीपथावर. लवकरच नाट्यगृह खुले होणार
·
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक उभारणे
·
शेंदुर्णी येथे प्रादेशिक पर्यटनातंर्गत परिसरात
विकास कामे करणे
·
जळगाव येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयाचे
बांधकाम करणे
·
कोथळी येथील संत मुक्ताई मंदिराचा जिर्णोद्वार
करणे
·
मुक्ताईनगर येथे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन
विद्यालय बांधणे
·
हिरापूर ते न्यायडोंगरी उडाणपूल
·
एरंडोल नेरी जामनेर मार्गावर म्हसावद गावाजवळ
उडाणपूल
·
औरंगाबाद पहूर मुक्ताईनगर रस्त्यावर बोदवड येथे
उडाणपूल
·
सावखेडा फाटा धरणगाव एरंडोल रस्त्यावर उडाणपूल
·
धुळे अंमळनेर चोपडा रस्त्यावर उडाणपूल
·
खिरोदा चिनावल वडगाव बलवाडी हतनुर रस्त्यावर
निंभोरा येथे उडाणपूल
·
कजगाव तरवाडे टेकवाडे पारोळा रस्त्यावर कजगावजवळ
उडाणपूल
·
सावदा ते सावदा रेल्वे स्टेशन उदळी हतनुर
रस्त्यावर उडाणपूलांना मंजूरी मिळाली आहे.
जळगावातील पिंप्राळा व शिवाजीनगर येथे तसेच आसोदा
भादली येथे उडाणपूल तर करगाव व भुसावळ येथे भुयारी पुलाचे बांधकाम करणे, रावेर
पातोंडी पिंप्रीनांदू डोलारखेडा रस्त्यावर रावेर स्टेशनजवळ उडाणपूल बांधण्याचे
प्रस्तावित असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
उपस्थितांचे
आभार जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी मानले.
000
No comments:
Post a Comment