जिमाका-जळगाव, दि. 20:- राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-
2017 अंतर्गत ज्या शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. अशा शेतक-यांनी पीक
कर्ज घेतलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबधित शाखेशी अथवा
राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेकडे योग्य त्या पुराव्यासह 31 जानेवारी 2018 पर्यंत
संपर्क साधावा. तसेच आपल्या पात्रता अथवा अपात्रतेबाबतची खातरजमा संबंधित बँकेकडून
करुन घ्यावी. असे आवाहन विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी
केले आहे.
शेतकरी सन्मान योजनेव्दारे ज्या शेतक-यांनी
कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरले असतील. परंतु त्यांना या योजनेव्दारे
अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. अशा शेतक-यांच्या याद्या (ताळमेळ
नसलेल्या) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बॅकांच्या संबधित
शाखांमध्ये शाखानिहाय प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. ज्या शेतक-यांनी
कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे. आणि अद्यापही या योजने अंतर्गत कोणताही
आर्थिक लाभ मिळालेला नाही. अशा शेतक-यांनी पीक कर्ज घेतलेल्या संबधित बँकेशी / बँक
शाखांकडे योग्य त्या पुराव्यासह (उदा. ऑनलाईन अर्ज, कर्जखाते उतारा, आधारकार्ड
इत्यादी) संपर्क साधून आपले पात्रता अथवा अपात्रतेबाबतची खातरजमा करुन घ्यावी. असे
श्री. जाधवर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment